मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आसून त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.
वांरवार विनंती करूनही गर्दी हटत नसल्यान हा निर्णय घेतला असल्याचा मुख्यमंत्री यांनी सांगितल आहे. राज्यात कोरोनाचे ८९ रूग्ण झाले आहेत. आपण सध्या कोरोनाच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहे. कोरोना रोखण्याची हीच वेळ आहे.
या काळात जीवानाश्यक वस्तू, औषधे, अन्न-धान्य तसेच त्याची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. कृषीमालाशी संबंधित वाहतूक सुरू राहील. सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील.खाजगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील. तसेच रिक्षा, टॅक्सी यामधील( चालक व १ प्रवाशी) प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.