मुंबई – महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक सीमेवर असूनही लोकांनी खासगी वाहने घेऊन प्रवास केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
काय आहेत मुख्यमंत्र्यांच्या घोषणा?
– जिल्ह्यांच्या सीमा सील. ज्या जिल्ह्यांत कोरोना पोहोचला नाही, तो जिल्हा सुरक्षित राहावा याकरता सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
– जीवनावश्यक वस्तूसाठी टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करता येणार, मात्र फक्त चालक आणि १ प्रवासीच गाडीत असेल.
– जीवनावश्यक वाहतूक वगळता बाकी सर्व वाहतूक रद्द
– आजपासून संचारबंदी लागू
– चारपेक्षा अधिक लोक जमल्यास कारवाई
– जिथं कोरोना पोहोचला आहे, तेथील नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.
– कृषी उद्योगासंबंधीत व्यापार, कारखाने आणि वाहतूक सुरू राहिल.