मुंबई – कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यु आव्हान केले आहे,22 मार्चला सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे, त्याला जनतेने १००% प्रतिसाद दिला पाहिजे असं आवाहन देशातील सर्व क्षेत्रातून केले जात आहे.
लोकांनी सकाळी 7 ते रात्री पर्यंत घराबाहेर निघू नये असं त्यांनी सांगितलं. मात्र सध्या सोशल माध्यमांमध्ये या चर्चे सोबतच या काळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद राहणार का? एक्सप्रेस गाड्या सुरु राहतील का? चर्चेत आला आहे.
दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर स्वःताहा रेल्वेने प्रशासनाने दिले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स 24 तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर न पडता घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.