औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे .
मात्र १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी परीक्षा तसेच पद्व्यूत्तर लेखी परीक्षा नियोजित वेळेवरच होणार आहे. याच बरोबर विद्यापीठाचा प्रशासकीय विभाग सुरूच ठेवण्यात येणार आहे.
राज्य सरकारने ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आदेश दिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी परिपत्रक जारी करत हे आदेश दिले. विद्यापीठच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.