मुंबई – ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होत. मात्र, त्यावरून राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आदित्य यांनी सोशल मीडियावर एक ट्विट सुद्धा शेअर केलं आहे.
आदित्य म्हणाले कि, “राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही. देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र तुम्ही भाषणात ‘शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही’ अशी टीका केली होती.
Shri @Dev_Fadnavis ji, normally I choose not to comment back. Kindly apologise abt bangles comment: bangles are worn by the strongest of all- the women. Politics can go on, but we need to change this discourse. Rather disgraceful coming from a fmr CMhttps://t.co/oMxPFWgdMS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 26, 2020
मात्र, बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही, त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे. असं ठाकरे बोलले.