वेलिंग्टन : भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील टी-२०, एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आजपासून बेसिन रिझव्र्ह येथे सुरू होणार अाहे. न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक मा-यापुढे भारताचा कस लागणार आहे.
भारत-न्यूझीलंड दरम्यान पहिल्या कसोटी लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
New Zealand have won the toss and they will bowl first in the 1st Test against #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/N4w4XQwRR1
— BCCI (@BCCI) February 20, 2020
दरम्यान, सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अग्रेसर असून, त्यांच्या खात्यावर ३६० गुण जमा आहेत. भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.