पवनानगर – मावळ तालुक्यासह पवन मावळ परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बदलत्या वातावरणुळे (ढगाळ वातावरणामुळे) बागायती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणाच्या सततच्या बदलामुळे काकडी, टोमॅटो, फरशी बी, बटाटा, पावटा अशा विविध प्रकारच्या पिकांची फूल गळती होऊ लागली आहे.
फूल गळती होऊ लागली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर वातावरणाच्या बदलामुळे पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सततच्या बदलामुळे शिवली येथील नवनाथ नथु आडकर यांच्या शेतातील 100 ते 150 टोमॅटोची झाडे करपून गेली आहेत.
पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास बागायती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.