मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ठाकरे सरकारमध्ये नसताना ते सतत जी मागणी करीत होते ती मागणी ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात आणली मात्र, प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना सरकारने केलेली कर्जमाफी बाबत नाराजी व्यक्त करत कर्जमाफीविषयी भाष्य केलं होतं.
दरम्यान, राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना सरकारने केलेली कर्जमाफी बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा खोचक सल्ला राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, महाविकास आघाडी सरकारनं केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरुन सत्तार यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.