नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावर कोणत्याही परिस्थितीत मध्यस्थी मान्य नाही, असे भारताने पुन्हा एकदा अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना रविश कुमार म्हणाले की, ‘काश्मीर प्रश्नावर तिसऱ्या मध्यस्थांची गरज नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही द्विपक्षीय मुद्दा असल्यास तो सिमला करारा अंतर्गत दोन्ही देश सोडवतील. पाकिस्तानने हिंसाचार आणि दहशतवादाचा मार्ग सोडून द्यावा. तसेच पाकिस्तानने संवादासाठी योग्य वातावरण तयार करावे असेही ते म्हणाले.