दुबई : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आयसीसीकडून पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
२०२३ च्या मोसमापासून हा बदल अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याचे कळते. हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी असेल. जर हा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यात यश आले, तर कसोटी सामना चार दिवसांचाच राहिल.
अनिर्णित राहणारे कसोटी सामन्यांच्या दिवसांची संख्या पाच दिवस करूनही बरेच सामने निकाली निघत नाहीत. दुसरीकडे काही सामने तर तीन दिवसांतच संपतात. त्यामुळे कसोटीला गतवैभव मिळावे यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने ४ दिवसांच्या कसोटी सामन्यासाठी आयसीसीने २ वर्षांपूर्वी २०१७ साली चार दिवसीय कसोटी सामन्यास परवानगी दिली होती. हा सामना अवघ्या २ दिवसात संपला व आफ्रिकेने हा सामना १ डाव आणि १२० धावांनी जिंकला.
नव्या वर्षात आयसीसी कसोटी खेळणा-या सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना बैठकीचे निमत्रंण देणार असून त्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. कसोटी सामने ४ दिवस केले तर एका दिवसात ९० ऐवजी ९८ षटके टाकली असतील.