मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील मुंबई वि. कर्नाटक हा सामना ३ जानेवारीपासून बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये रंगणार आहे. त्यासाठी मुंबईचा १५ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये अंजिक्य रहाणे, पृथ्वी शाॅ या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मुंबई संघामध्ये समावेश करण्यात आला आहे, तर श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
रहाणे आणि शाॅ यदांच्या मोसमात मुंबईकडून २ सामने खेळले आहेत. शाॅने बडोदा विरूध्द सामन्यात व्दिशितक झळकावल होत तर रेल्वेविरूध्द तो दोन्ही डावात अपयशी ठरला होता. रहाणे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६३ कसोटी सामने खेळला आहे पण या दोन सामन्यात मुंबईकडून खेळताना तो अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही.
मुंबई संघ : सूर्यकुमार यादव ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शाॅ, आदित्य तरे, सर्फराझ खान, शुभव रांजणे, आकाश पारकर, सिध्देश लाड, शम्स मुलाणी, विनायक भोईर, शंशाक अत्तार्डे, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी, एकनाथ केरकर, राॅयस्टन डायस.
दरम्यान, रणजी स्पर्धेत मागील सामन्यात मुंबई संघास रेल्वे संघाकडून १० विकेटसनी पराभव पत्कारावा लागला होता , तर या मोसमातील पहिल्या सामन्यात मुंबईने बडोद्याचा ३०९ धावांनी पराभव केला होता.