मुबई – सध्या संपूर्ण देशात नागरिकत्व कायद्याविरुद्ध वणवा भडकलेला असून, देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याविरोधात आवाज उठवला आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने देखील उघडपणे आपली भूमिका मांडत सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. सैफ म्हणाला कि, “एक सामान्य नागरिक म्हणून देशातील सध्याच्या स्थितीबाबत मला चिंता वाटत आहे…हे सगळं कुठे जाऊन थांबणार. देशात सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत मी सर्व अंगांनी विचार करत आहे. अजून बरंच आकलन व्हायचं आहे… ते झाल्यानंतरच माझे ठाम मत मी मांडू शकेन… हा मला पडलेला प्रश्न आहे”. अश्या भावना सैफ व्यक्त केल्या आहेत.