नवी दिल्ली : एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन केले. हैदराबाद येथील दारुस्सलाम येथे आयोजित या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जे लोक एनआरसी आणि सीएए विरोधात आहेत, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा, असे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले.
AIMIM leader Asaduddin Owaisi in Hyderabad: Whoever is against the National Register of Citizens (NRC) and Citizenship Amendment Act (CAA) should fly tricolour outside their homes. This will send a message to BJP that they have made a wrong and ‘black’ law. (21.12) pic.twitter.com/LOyBlR5v9t
— ANI (@ANI) December 21, 2019
जो कोणी एनआरसी आणि सीएएविरोधात आहे, त्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. त्यामुळे चुकीचा आणि काळा कायदा केल्याचा संदेश भाजपला जाईल. यावेळी ओवेसी यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचली.
एनआरसी आणि सीएएविरोधातील हिंसक आंदोलन चुकीचे असल्याचे ओवेसी यांनी म्हटले. कोणत्याही परिस्थितीत हिंसा नसायला हवी. तुम्हाला कोणी छेडले तरीही हिंसा व्हायला नको. हे आंदोलन किमान सहा महिने चालले पाहिजे. यासाठी आवश्यक ती शांतता राहिली पाहिजे. आपल्याला लोकशाही पद्धतीने सामना करायला हवे, असेही ते म्हणाले.