दिल्ली – दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपीना फाशी फासावर लट्कवण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारकडे दोन जल्लादाची देण्याची मागणी केली आहे. चार आरोपीना निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती .
तिहार प्रशासनाच्या पत्राला उत्तर देताना उत्तर प्रदेशच्या कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले कि, आम्ही तिहार प्रशासनाला कोणत्याही वेळी जल्लाद देण्यास तयार आहोत.
या पत्रात पुढे म्हटले आहे की निर्भया प्रकरणातील चार दोषी पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, मुकेश सिंग आणि विनय शर्मा हे दोन वर्षांची फाशीची शिक्षा भोगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यूपी कारागृह प्रशासनाकडे दोन जल्लाद आहेत, एक लखनऊ आणि दुसरा मेरठमध्ये.
दुसर्या अहवालानुसार, निर्भया बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केलेल्या लोकांकडून दोन विदेशी पत्रे मिळाली आहेत. अधिका्यांना दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, छत्तीसगड, केरळ, तामिळनाडूमधून पत्रे मिळाली आहेत.