दिल्ली : सर्वोच्य न्यालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी निर्भया प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेतली आहे. त्याच्या पुतण्याने निर्भयाच्या बाजूने युक्तिवाद केल्यामुळे न्यामूर्ती बोबडे सुनावणीपासून वेगळे झाले आहे. दरम्यान याचिकेवरील सुनावणीसाठी नवीन घटनापीठ बुधवारी सकाळी स्थापन केले जाईल.
निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली आहे. आरोपीच्या वकिलाला युक्तिवादासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला. अशिलाविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केला.
Chief Justice of India (CJI) recuses himself from hearing the Nirbhaya rape case on personal grounds. https://t.co/vzclJUbgbf
— ANI (@ANI) December 17, 2019
डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आरोपींना शिक्षा होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत आहे. हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचं बोललं जातं आहे.