चिंबळी-गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील कांदा पिकासह पालेभाज्यांवरही रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खेड तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मरकळ परिसरातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव परिसरात शेतकरी वर्गांनी लावलेल्या कारली, दोडका, घोसाळी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाला असल्याने फुले गळू लागली आहेत.