टाकळी हाजी, (वार्ताहर) – येथे सागर किराणा स्टोअर्स या लागून मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत सव्वीस लाख रुपयाचे रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती तलाठी बी. बी. चौधरी यांनी दिली.
दुकानाचे मालक दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांच्या दुकानाला 2 मे रोजी पहाटेचे सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात पेटल्यामुळे शेजारीच झोपलेले कांदळकर कुटुंबाला जाग आल्याने ही घटना निदर्शनास आली; परंतु काही करण्याच्या आधीच सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
दुकानातील सर्व किराणा साहित्य, फ्रीज, आत लावलेली मोटासायकल तसेच किचन व त्यातील सर्व भांडी व साहित्य जळून खाक झाले. ते दुकानाच्या शेजारील खोलीत झोपले होते. त्यांना जाग आल्याने कुटुंब सुरक्षित राहिले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट देत वरिष्ठ अधिकारी तसेच तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना संपर्क करून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
विद्युत अभियंता टाकळी हाजी येथील राजेंद्र इंगळे, तलाठी बी. बी. चौधरी, ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांनी पंचनामा केला असून कार्यवाहीसाठी पाठवल्याचे सांगितले. यावेळी आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, पुणे पालिका अधिकारी शिवाजी बोखारे, व्हाइस चेअरमन साहेबराव लोखंडे, प्राचार्य आर. बी. गावडे, खंडू जाधव, धोंडिभाऊ जाधव व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी देखील भेट देऊन पाहणी केली.
जळीताची घटना ही खूप मोठी असून यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सरकारी पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच दुकानाचे मालक दत्तात्रय कांदळकर यांची आर्थिक परिस्थिती हो गरीब असून त्यांना स्थानिक पातळीवर आर्थिक मदत करावी.. -पोपटराव गावडे, माजी आमदार