तृणमूलमध्ये 300 कार्यकर्त्यांचा समावेश
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला तिन्ही जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यानंतर काही दिवसांतच कॉंग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही पक्षातील सुमारे 300 हून अधिक कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात सहभागी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मालदा जिल्ह्यातील रतुआ 2 समुदाय विकास खंडच्या मीरजादपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार मौसम बेनझीर नूर यांनी कॉंग्रेस आणि भाजप सोडून आलेल्या कार्यकर्त्यांचे तृणमूलमध्ये स्वागत केले. मौसम यांनी नवीन कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचा झेंडा दिला. मालदाच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित काम करु असे त्या म्हणाल्या.
तृणमूलमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने म्हटले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहे. त्यामुळे प्रभावित होऊन आम्ही तृणमूलमध्ये सहभागी म्हटले. गुरुवारी तृणमूल कॉंग्रेसने विधानसभा पोटनिवडणुकीत तिन्ही जागा-कालीगंज, खडगपूर सदर आणि करीमपूर येथे विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी हा मोठा विजय मानला जात आहे.