चेन्नई – तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे भिंत चार घरांवर कोसळली असून यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
तामिळनाडूच्या मेट्टूपलायम परिसरातील नादूर कनप्पन येथे मुसळधार पावसामुळे खासगी कम्पाउंडची भिंत चार घरांवर कोसळली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन मुले, १० महिलांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या साहाय्याने बचावकार्य सुरु आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
Coimbatore District: #TamilNadu Government announces compensation of Rs 4 lakhs each to families of those who have lost their lives in wall collapse in Mettupalayam. #Tamilnadurains https://t.co/pc73gJU5De
— ANI (@ANI) December 2, 2019
दरम्यान, तामिळनाडूत मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा-कॉलेजला सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.