पुणे: महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपत देण्यात अली आहे. या घटनेवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले कि हा माझ्या साठी धक्का नाही. मी तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होत कि उद्धव ठाकरेंचा पोपट होणार आहे. याची मला पूर्व कल्पना होतीच.
या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मागील एक महिना सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्ता नात्याला आता या घटनेनं ब्रेक लागला आहे. यावर आंबेडकरांनी शरद पवारांना दोष देत त्यांच्यावर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेनं माझं ऐकायला पाहिजे. मी यापूर्वीच सांगितलं होत कि उद्धव ठाकरेंचा पोपट होणार आहे. आणि तो झालाच. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्रात मदत जाहीर केली असताना देखील शरद पवार पंतप्रधानांची भेट का घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
तसेच राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का असाही सवाल त्यांनी विचारला आहे.