काऱ्हाटी – सुपे परिसरात परतीच्या पावसानंतर अचानक आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, यातसर्वाधिक फटका कांदा पिकांना बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतात असलेल्या पिकांची झाली नासाडी शेतात पाणी साचल्याने पिके जागेवर सडून पिवळी होऊ लागल्याने शासनाच्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाच्या वतीने सुपे परिसरात पंचनामे करण्यात आले, अशी माहिती सुपा मंडळाचे कृषी अधिकारी एस. एम. बोराटे यांनी दिली.
शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून झालेले पिकांच्या जिओ टॅगिंग फोटोप्रत व कागदपत्रे जमा करून यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. काऱ्हाटी परिसरातील सर्व पंचनामे 100 टक्के झालेले असून त्यांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असल्याचे बोरटे यांनी स्पष्ट केले.