मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर सत्तास्थापनेसंदर्भात भाजप सेनेची बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु बैठकीच्या काही तास अगोदर ही बैठक अचानक रद्द झाली होती. ही बैठक रद्द का झाली याबद्दल शिवनेचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार होती. ज्यात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रमुख भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई असणार होते. मात्र बैठकीच्या एका तास आधीच मुख्यमंत्री यांनी ‘मुख्यमंत्री’पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे सांगितल्याने ही बैठक रद्द झाली. असा खुलासा राऊत यांनी एखा खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा दोन्ही पक्षातील सुरु असलेला सत्तासंघर्ष काही थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे.
दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रश्न राज्याच्या नेत्यांवर सोपवला आहे. मात्र राज्याचे नेते हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून त्याला आम्ही जवाबदार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.