चिंबळी- यंदा मुसळधार पावसाने झोडपले असल्याने शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी, मरकळ, मोई, निघोजे परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडक उष्णता वाढली आहे, तर रविवारी (दि. 3) पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी सात वाजतेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने मोटरसायकल चालविताना कसरत करावी लागली होती, तर सकाळी पुन्हा 9 वाजल्यापासून कडक ऊन पडल्याने पुन्हा उष्ण वातावरण निर्माण झाले होते.