मुंबई – विनाशकाले विपरीत बुद्धी शिवसेनेची नाहीतर भाजपाची अवस्था आहे. दिलेला शब्द पाळण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांकडून मिळालेली आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना इतर पर्यायांचा विचार केला तर ती विनाशकाले विपरीत बुद्धि ठरेल अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्रीपदाचे समसमान वाटप व्हावे हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला पाहिजे. एवढेच नाही तर आम्ही नरमाईची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते असे शिवसेनेने म्हटले आहे त्यामुळे यात नरमाईचे काहीही धोरण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut, Shiv Sena on Sudhir Mungantiwar’s statement ‘Shiva Sena deserves more than 13 (seats)’: Is Sudhir Mungantiwar going to become a minister? Jo-jo pramukh neta hain ya toh woh haar gaye hain ya unko satta se dur rakhne ki saazish chal rahi hai mere hisaab se. https://t.co/OPOBoE2s7i pic.twitter.com/aiCbn4V95b
— ANI (@ANI) October 31, 2019
अमित शाह यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद पार पडली होती त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्युला असेल हे म्हटले होते. आमचीही तेवढी एकच मागणी आहे. तसेच शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असे जर भाजपा म्हणू शकते तर तो हक्क आम्हालाही आहे. मात्र उद्धव ठाकरे हे पाप करणार नाहीत तसे त्यांनी आधीच स्पष्ट केले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे स्पष्ट असले तरी, दुसरीकडे भाजपा व शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.