मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू असून पक्षाच्या नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांची बैठका पार पडत आहे. तसेच यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आगामी मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा होणार असं सागण्यात येत आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाची जागा जास्त त्याचं पक्षातील मुख्यमंत्री होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य केले होते.