घोटवडे येथे शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांचे आवाहन
पौड – विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभेची गुलामगिरी निपटून काढायची आहे, त्यासाठी प्रतिनिधी बदल म्हणजेच परिस्थिती बदला, असे आवाहन शिवसेना उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसैनिकांसह जनतेला केले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा, दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुळशीचे माजी उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी घोटावडे येथे केले होते. यावेळी भोर, वेल्हे, मुळशी येथील हजारो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शहरसंपर्क प्रमुख बाळा कदम, जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, संपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, माजी प्रमुख दत्तात्रय टेमगरे, जिल्हा बॅंक सदस्य आत्माराम कलाटे, नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, सागर काटकर, बारामती लोकसभा शालिनी देशपांडे, महिला माजी संघटक स्वाती ढमाले, संघटक संगीता पवळे, भोर विधानसभा प्रमुख प्रकाश भेगडे, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, युवा जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे, जिल्हा विध्यार्ती प्रमुख राम गायकवाड, मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ, भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे, वेल्हा प्रमुख शैलेश वालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र मिर्लेकर पुढे म्हणाले की, 2004 ला शिवाजीराव आढळराव निवडून आले होते, तेव्हापासून मुळशीवर सेनेवर खूप प्रेम केले आहे. मतदारसंघ बदलला तेव्हापासून आपण मुकलो आहोत. छत्रपतींच्या राजधानी इथे आहे. मग याच विधानसभेवर भगवा फडकत नसल्याची चीड येत नाही का, विकास नाही तरीही त्यांनाच मत कशी पडत, तुम्ही लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या का, बुथप्रमुखांनी संवाद साधला पाहिजे, शिवसैनिक हा जळत्या निखऱ्यासारखा असला पाहिजे, हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. रमेश कोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करायचे असेल तर जो या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन येईल, तोच शिवसेनेचा आमदार असेल.
भोरच्या आमदारांनी नागरिकांचे प्रश्न सोडवणारी मुळशीची आमसभा बंद केली. थोपटे मंत्री असताना स्वत:च्या संस्था वाढवल्या, सरकारी जागा ताब्यात घेतल्या; पण औद्योगिक नगरी होऊ दिली नाही, येणारी लढाई अवघड असली तरी ती शिवसेनाच जिंकणार.
– बाळासाहेब चांदेरे, माजी उपसभापती, मुळशी