मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून, कोहिनुर प्रकरणी ईडीकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. येत्या 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. मात्र, यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठाणे, कल्याण बंदचं आवाहन केलं आहे. त्या दिवशी अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचक इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. कारण, ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असतं. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे राज यांना नेमकी कशासाठी नोटीस आलीय याबद्दल मी अनभिज्ञ आहे. ईडीच्या चौकश्या सुरूच असतात. त्यात सूडबुद्धीचा संबंध कुठे आला? चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही”. असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे.