शेतीचे 27 हजार हेक्टरक्षेत्र पाण्याखाली
आसाम : आसाममध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता राज्याला पुराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. राज्यात आलेल्या पुराचा फटका 8 लाख नागरिकांना बसला असून इथले जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर आतापर्यंत 6 जणांचा या पुरात मृत्यू झाला आहे.
राज्यातील 27 पैकी 21 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती नाजूक झाली आहे. तसेच राज्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, पुरामुळे राज्यातील शेतीचे 27 हजार हेक्टरक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. तर इथल्या 7 हजारपेक्षा जास्त नागरिकांना निर्माण करण्यात आलेल्या सुरक्षा कॅंपमध्ये स्थलांतरित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.