पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अल्काॅन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत असून या घडनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून 15 मजुर कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे.मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
या अपघाताला जबाबदार असण्याऱ्या लोकांवर @pmcpune ने त्वरित कारवाई करायला हवी.— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) June 29, 2019
दरम्यान, या दुर्घटनेबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे त्यांनी या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना श्रद्धांजली वाहिली असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर महापालिकेने त्वरित कारवाई करायला हवी अशी मागणी केली आहे.