पिंपरी – उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर मान्य करुन मराठा समाजाला न्याय दिला आहे. आता राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनात आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयानेही मराठा समाजाच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे शिवशाही व्यापारी संघाचे व लहुजी शक्तीसेना पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी मनापासून स्वागत करीत असून आरक्षणाच्या लढाईत मराठा बांधवाबरोबर अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांनी तसेच बहुजन समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे शासनाने तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी या निवदेनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांची स्वाक्षरी आहे.