प्रा. डॉ. बी. एन. शिंदे यांचे मत; पाणी साठवून शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान
उत्पन्न वाढविणाऱ्या 230 शेतकऱ्यांचा सत्कार
223 शेततळ्यातून 100 कोटी लिटर पाणी अडविले
नगर – वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले आहे. दर 2-3 वर्षांतून दुष्काळ पडत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना जलबचतीच्या उपाययोजना करणे आणि शेती पिकांचे योग्य नियोजन करणे तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे या शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन नगरमधील प्रसिद्ध हवामानतज्ञ प्रा. डॉ. बी. एन. शिंदे यांनी केले.
नगर सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जलसमृद्धीतून जनसमृदीकडे या एम्बी कंपनीच्या अवाना प्रकल्पात सुमारे 223 शेततळे करून 100 कोटी लिटर पाण्याची साठवण करीत त्याद्वारे शेती करून दुप्पटीने उत्पन्न वाढविणाऱ्या जिल्ह्यातील 130 शेतकऱ्यांचा गौरव गुरुवारी (दि.30)दुपारी नगरमध्ये करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवृत्त कृषी अधिकारी रामेश्वर चांडक, एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक मकरंद अप्पलवार, अवाना प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली अप्पलवार, महाराष्ट्र व राजस्थानचे व्यवस्थापक रुपेश सावंत, राकेश काटकर, वैभव देवरुखकर, जिल्हा वितरक अतुल काळे, आदींसह जिल्हाभरातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मकरंद अप्पलवार म्हणाले, नगरमधील जवळपास 450 गावे दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात आली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी 2011 मध्ये 200 फूट होती आज तब्बल 350 – 400फूट खोल गेली आहे. अवाना हे एम्बी चा विशेष उपक्रम आहे ज्याचा अंतर्गत शेतकऱ्यांना परवडणारी जलसंवर्धनाकरीत उपयुक्त अशी विविध उत्पादनाची निर्मिती केली जाते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यास व त्याचे उत्पादन वाढवण्यास मदत होते. मार्च 2019 पर्यंत अवाना ने 5,004 शेततळ्याची निर्मिती केली व त्यामाध्यमातून 30,000 लोक प्रभावित झाले, व त्यामधून 20,000 दशलक्ष लिटर्स पाणी वाचविले आणि त्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न 98.7 टक्के वाढले.
अवाना प्रकल्प प्रमुख मैथिली अप्पलवार म्हणाल्या, अवाना येथे, आम्ही पाणी साठवण करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन घेत आहोत. आम्ही केवळ शेत तलावांची निर्मिती करण्यासच मदत करत नाही, तर आम्ही रास्त दरात
सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे. तसेच आम्ही शेतकऱ्यांना बॅंकांकडून अर्थसहाय्य मिळवण्यास मदत करतो, पाण्याच्या संवर्धनातील तज्ज्ञांच्या सहकार्याने आणि स्थानिक तरुणांच्या भागीदारीने जलसंवर्धनचे कार्य सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही आता डेटा-संचालित पध्दती आणि इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट पद्धतीने पाण्याचा वापर करण्यास उद्युक्त करतो. आम्हाला शेतकऱ्यांची निर्णयक्षमता वाढवून त्यांना स्वयंसिद्ध होण्यास मदत करायची आहे, जेणे करून त्यांना पाण्याकरिता पावसावर अवलंबून न राहता त्यांनी त्यांचे आवडीचे पीक, त्यांचे आवडीच्या ठिकाणी व त्यांचे आवडीच्या वेळेस घेण्याची मुभा मिळावी 2016 मध्ये अवानानी जगातील सर्वात रुंद शेततळ्याच्या कापडाची निर्मिती केली. 2017 मध्ये अत्याधुनिक प्रोटेक्स टेकनॉलॉजि वापरून अतिनील किरणांपासून कापडाचे संरक्षण करीत दीर्घ आयुषी कापड शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले यावर्षी, हॅबिटेक टेकनॉलॉजि चा वापर करून मत्स्योत्पादनाकरिता उपयुक्त असे आधुनिक शेततळ्याच्या कापड उपलब्ध करण्यात आले. या कार्यक्रमात दिवसभर शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पाण्याची बचत, शेती पिकांचे नियोजन या विषयी विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.