पटना- भाजपाची साथ सोडत काँग्रेसवासी झालेले ‘शत्रुघ्न सिन्हा’ यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांची पाठराखण केली आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, लालू प्रसाद यादव यांना विनाकारण या घोटाळ्यात फसव्यात आले असून, २३ मे नंतर लालू जेलचे दार तोडून बाहेर येतील. बिहार मधील वाल्मिकीनगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची २३ मे ही एक्सपायरी डेट आहे.
वाल्मिकीनगर लोकसभा मतदार संघात शाश्वत केदार यांचा उमेदवारी मिळाली असून, त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार वैद्यनाथ प्रसाद महतो यांच्याशी होणार आहे. लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरणात गेले 24 महिने कारागृहात शिक्षा भोगत आहेत. काहीदिवसांन पूर्वी लालूंच्या जामीन अर्जाला सीबीआयने कडाडून विरोध केला होता.