नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.
यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व सुषमा स्वराज उपस्थित होत्या. दरम्यान, सुषमा स्वराज म्हणाल्या जगात भारताची प्रभुत्व आणि प्रतिष्ठा जेवढी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वाढली तेवढी कोणाच्याच नेतृत्वात वाढली नाही.
विश्व में भारत का प्रभुत्व और प्रतिष्ठा जितनी मोदी जी के नेतृत्व में बढ़ी है। इतनी पहले कभी नहीं बढ़ी: श्रीमती सुषमा स्वराज #BJPSankalpPatr2019 pic.twitter.com/ejKRfeNtRf
— BJP (@BJP4India) April 8, 2019