नवी दिल्ली – देवाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी लोक पूजा करतात. खऱ्या मनाने पूजा केली तर माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजा करताना दिवा विझला तर ते खूप अशुभ लक्षण मानले जाते, असा अनेकांचा समज आहे. यामागे कोणती धार्मिक कारणे आहेत ते जाणून घेऊया.
हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो. सकाळ-संध्याकाळ पूजेला दिवा लावण्याची परंपरा आहे. दिव्या शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच घरात दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात. पुराणानुसार पूजेदरम्यान तूप आणि तेलाचे दिवे लावावेत.
दिवा विझण्याचा अर्थ काय आहे
पूजेच्या वेळी दिवा विझण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु हिंदू मान्यतेनुसार दिवा विझणे म्हणजे तुम्ही मनापासून पूजा केली नाही किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकीचे घडलेले आहे असं अनेकजण मानतात. आरतीच्या वेळी दिवा विझणे हे देखील अशुभ लक्षण असलयाचे अनेकजण मानतात.
दिवा विझला तर काय करावे
पूजा करताना अचानक दिवा विझला तर देवाची माफी मागून पुन्हा दिवा लावू शकता. पूजा सुरू करण्यापूर्वी त्यात पुरेसे तूप-तेल टाकावे, जेणेकरून दिवा विझण्याची शक्यता नाही. तसेच वातीची लांबी लक्षात ठेवा. तसेच दिवा लावताना त्यावर हवा कुठूनही येऊ नये हे लक्षात ठेवा.