मुंबई – उन्हाळ्याचा दुसरा महिना संपत आलेला असताना राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांची नासाडी झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे. त्यानंतर आता शुक्रवारपासून राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे आधीच रब्बी पीकं हातातून गेली असताना आगामी हंगामाही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. परंतु आता वादळी पावसाला पोषक हवामान होत असल्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील सात दिवस विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गोदिंया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेडसह लातूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.