जळोची (पुणे) – मुख्यमंत्र्यांनी शेरा मारलेला असला तरी शहानिशा करूनच पुढे कार्यवाही व्हावी असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यासंबंधीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री अथवा अन्य मंत्री त्यांच्या जवळच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी पाॅझिटीव्ह रिमार्क मारतात. त्याची अंमलबजावणी करणे अधिकारी वर्गाला जड जाते. त्यामुळे अधिकारी वर्गाला देखील थोडेसे नैराश्य आले होते.
अधिकारी नाराजीने बोलायला लागले होते. हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी मागणी होत होती. मग याला पर्याय म्हणून रिमार्क मारला असला तरी संबंधित सचिव अथवा अधिकाऱयाने त्याची नीट शहानिशा करावी. चुकीचे काही घडत असेल तर ते निदर्शनास आणून द्यावे, त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे ठरले. वास्तविक यामुळे कागदपत्रांची, फाईल्सची संख्या वाढणार आहे.
दुर्दैवी: मकर संक्रांतीच्या दिवशी घरी जाताना महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू
राज्यकर्त्यांनी काढलेली ही पळवाट म्हणावी लागेल. उद्या अधिकारी म्हणतील तुम्ही रिमार्क मारता आणि चुकीचे काही घडले की आम्ही जबाबदार, हे कसे चालणार. असे प्रशासन चालत नाही. या उलट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा मंत्र्यांनी, सदरची मागणी तपासून नियमाप्रमाणे कार्य़वाही करावी, असा शेरा मारायला हवा. पण असे केले जात नाही. आता त्यांचे सरकार आहे, त्यांना वाटेल तसे ते निर्णय घेतात.
नितीन गडकरींना तुरुंगातून धमकीचा फोन आला, यासंबंधी पवार म्हणाले, या विषयात केंद्राची टिम तेथे तातडीने पोहोचली. राज्य सरकारनेही पथक पाठवले होते. गडकरी हे जबाबदार केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या संदर्भात असे काही घडणे उचित नाही. कर्नाटकातून तो फोन आलेला आहे. सगळी वस्तुस्थिती लवकरच आपल्यासमोर येईल.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी युती होत आहे, यासंबंधी महाविकास आघाडीत चर्चा झाली का या प्रश्नावर पवार म्हणाले, तुम्ही तेच तेच मुद्दे का विचारता? महाविकास आघाडीला जर एकोप्याने जायचे असेल तर सेनेचे जवळचे मित्रपक्ष आहेत त्यांना स्वतःच्या कोट्यात सामावून घ्यावे. राष्ट्रवादी, काॅंग्रेसने त्यांना आपापल्या कोट्याने सामावून घ्यावे. त्यामुळे महाविकास आघाडीशी या संबंधी चर्चा होण्याचे काही कारण नाही.