Balasaheb Thorat – आरक्षणाचा मुद्दा सभागृहात गाजत असून गुरुवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीवारीची गरज असून, एखाद्या दिल्लीवारीतून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असा टोला शिंदे–फडणवीस सरकारला लगाविला.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानसभेत आरक्षणाच्या 293 प्रस्तावावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी तुम्ही काम करत आहात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुपळ्यासमोर जाऊन शपथ घेतली. परंतू त्यात काय समस्या असतील? कसे समोर जाता येईल? याचा विचार त्यांनी करायला हवा होता.
दुसरीकडे तुम्ही बघत असाल की एक हजार पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाल्यानंतर त्यासाठी लाखोच्या संख्येने युवक अर्ज करतात. त्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांची संख्या मोठी असते. त्यातील मोजकेच निवडले जातात. उर्वरीत हजारोंच्या संख्येने गावी परतात.
त्यांची अस्वस्थता पाहण्यासारखी आहे. या युवकांमध्ये धमक आहे. ते देशासाठी काही करु शकतात. परंतू त्यांना संधीच नाही, आज शेतीची अर्थव्यवस्था वाईट झाली आहे.
घरात, दारात दारिद्र्य दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व पुढे आले आहे. ते जनसामान्यांचे प्रतिनिधत्व करत आहे असे माना.
जरांगे पाटील यांच्या सभेबाबत चर्चा करताना लोकांच्या संख्येची चर्चा करत नाहीत तर किती एकरावर सभा झाली यावर करतात. हे कसलं द्योतक आहे. तेव्हा त्यांची भावना ओळखून त्यांना न्याय मिळून देणे गरजेचे आहे, असेही यावेळी थोरात म्हणाले.