Rohit Sharma – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आजच्या सामन्यापूर्वीच्या काल (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं होत. त्याने म्हटले होते की, मी सध्या तरी टी-२० क्रिकेट खेळणे सोडलेले नाही. रोहितच्या याच वक्तव्यानंतर बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया देलेली आहे. बीसीसीसीआयने एक प्रकारे वरिष्ठ खेळाडूंबाबत टी-२० क्रिकेटसाठीची भूमिकाच स्पष्ट केली आहे. टी-२० क्रिकेट खेळणे न खेळणे याबाबत मी निर्णय घेतलेला नाही, अशी भूमिका रोहितने घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारताने पाहुण्या संघाचा २-१ने पराभव केला. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर काही वरिष्ठ खेळाडूंचा विचार केला जाणार नसल्याचे संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर यापुढे आता भारतीय संघाच्या टी-२० क्रिकेटसाठी आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचाही विचार केला जाणार नाही. बीसीसीआय वरिष्ठ खेळाडूबद्दल अशी भूमिका घेत असल्याने रोहित शर्माने केलेले वक्तव्य वादाचे कारण बनले आहे. मी स्वतः टी-२० खेळणे सोडलेले नाही आणि त्याच्या विचार सध्या करणार नाही, अशी भूमिका रोहितने स्पष्ट केली होती.
Captain @ImRo45 was all praise for youngsters @ShubmanGill & @ishankishan51 ahead of the #INDvSL ODI series starting tomorrow 👌🏻👌🏻@mastercardindia pic.twitter.com/vlZyeGpChP
— BCCI (@BCCI) January 9, 2023
रोहितच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले की,”आम्हाला भारतीय क्रिकेटचे सर्वोत्तम हित जपायचे आहे, एका व्यक्तीचे नाही. आम्हाला वाटते की रोहित आणि विराट यांच्यापासून पुढे जाण्याची वेळ आली आहे. भविष्य लक्षात घेऊन संघांची योजना करा आणि तयार करा. पण अंतिम निर्णय निवडकर्ते घेतील.” श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची जाबाबदारी देण्यात आली होती. रोहितला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आता सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे.