नवी दिल्ली – लोकांना हल्ली प्रत्येक गोष्टीची अडचण आहे. महिलांनी हिजाब घातला तरी त्यांना अडचण होते आणि बिकिनी घातली तरी अडचण होते अशी प्रतिक्रिया तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री नूसरत जहां यांनी दिली आहे. शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावरून सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका वाहिनीशी बोलताना ही भूमिका मांडली आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे अलिकडेच सगळीकडे झळकले. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर सगळीकडे दिसत आहेत.
“हा नेहरूंचा नव्हे; मोदींचा नव भारत,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
या गाण्यात चित्रपटातील कलाकार दीपिका पादुकोन हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याचे दिसून आल्यामुळे गदारोळ माजला आहे. काही हिंदुतत्वादी संघटना आणि भारतीय जनता पार्टीनेही यावर टीका केली आहे. पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर नुसरत जहांने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा काही विचारधारेचा प्रश्न नाही. सत्तेत असलेल्या पक्षाकडून लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न आहे.
“हा नेहरूंचा नव्हे; मोदींचा नव भारत,” भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
अध्यात्मिक किंवा धार्मिक असले काही नसून केवळ विचारपूर्वक आखलेला हा कट आहे. त्यामुळेच ते लोक संस्कृती, बिकिनी परिधान केलेली महिला आदी विषयांवर बोलत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीची अडचण आहे. आजच्या नव्या भारतातील महिलांनी काय परिधान करावे हे ते सांगत आहेत. आम्ही काय नेसायचे, काय खायचे, काय बोलायचे, शाळेत काय शिकायचे, टीव्हीवर आम्ही काय पहायचे, हे सांगून आमच्या आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ज्याला आजचा नवा, विकसित भारत म्हटले जाते आहे तो अत्यंत भयावह आहे. येणाऱ्या काळात ही मंडळी आपल्याला कुठे नेतील याची भिती वाटते आहे.