नवी दिल्ली – सध्याचा भारत 1962 या वर्षातील माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा नव्हे. सध्याचा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. आताच्या नव भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यास चोख प्रत्युत्तर दिले जाते, अशा शब्दांत भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. चीन निर्माण करत असलेल्या युद्धाच्या धोक्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. त्या टीकेला भाजपचे प्रवक्ते राज्यवर्धनसिंह राठोड यांनी प्रत्युत्तर दिले.
BJP ला हरवण्याची क्षमता असणारा Congress एकमेव पक्ष, कुणीही कमी लेखू नये – राहुल गांधी
राहुल भारतीय सुरक्षा आणि सीमा भागांविषयी बोलले. देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि जवानांचे मनोबल खच्ची करण्यासाठी त्यांनी संबंधित वक्तव्ये केली. स्वत:ला रिलॉंच करण्यासाठी राहुल यांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत, असे ते म्हणाले. नेहरू पंतप्रधान असताना चीनने भारताची 37 हजार 242 चौरस किलोमीटर भूमी बळकावली. पण, आताचा भारत नेहरूंचा नव्हे, अशी पुस्तीही राठोड यांनी जोडली. भारत आणि चीनमध्ये 1962 मध्ये युद्ध झाले. त्याचा संदर्भ त्यांनी दिला.
BJP ला हरवण्याची क्षमता असणारा Congress एकमेव पक्ष, कुणीही कमी लेखू नये – राहुल गांधी