संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ( Security Council ) काश्मीरचा विषय पुन्हा एकदा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या आणि शेजारच्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या सामर्थ्यशाली गटासमोर प्रवचन देण्याचा अधिकार नाही, असे परराष्ट्र मंत्री ए. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. बुधवारी बहुपक्षीयतेच्या मुद्यावर सुरक्षा परिषदेत सुरू असलेल्या खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर जयशंकर यांनी हे परखड उत्तर दिले आहे.
#BharatJodoYatra | राहुल गांधींचा पायी प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का?
सध्याच्या घडीला आपल्या समोर असलेल्या साथीचे रोग, वातावरण बदल संघर्ष किंवा दहशतवाद यासारख्या आव्हानांना कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाते आहे, त्यावर संयुक्त राष्ट्राची विश्वासार्हता अवलंबून असते. बहुपक्षीयतेमधील सुधारणांवर आपला स्वाभाविक भर आहे. आम्ही स्वाभाविकपणे आपली भूमिका मांडू शकतो. याला आता अधिक विलंब व्हायला नको, असे वाढते वैचारिक अभिसरण आहे, असे जयशंकर म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षतेत बहुपक्षीयतेसाठीच्या सुधारणांसाठी अध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करताना ते बोलत होते.
#BharatJodoYatra | राहुल गांधींचा पायी प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का?
सुरक्षा परिषेदत ( Security Council ) दहशतवादाचा विरोध आणि बहुपक्षीयतेतील सुधारणांच्या मुद्यावरील दोन ठरावांवरील चर्चेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. सुरक्षा परिषदेतील या खुल्या चर्चेमध्ये बिलावल भुट्टोंव्यतिरिक्त अन्य 60 वक्त्यांनी आपली मते मांडली. भुट्टो यांनी आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर 11 सप्टेंबरच्या हल्ल्यामागे असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये एबोटाबाद येथे रहात होता, त्याला अमेरिकेच्या नेव्ही सिल्स कमांडोंनी 2011 मध्ये ठार केले होते. पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंम्मदच्या दहशतवाद्यांनी 2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. त्यात 9 जण ठार झाल्याचा संदर्भही जयशंकर यांनी दिला.
370 वे कलम रद्द केल्यापासून तणाव
भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्य घटनेतील 370 वे कलम 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द केल्यापासून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानने भारताबरोबरचे उच्चस्तरिय संबंध तोडून टाकले आणि भारतीय दूतांचीही हकालपट्टी केली आहे. मात्र 370 वे कलम रद्द करणे हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानने प्राप्त परिस्थिती स्विकारून भारतविरोधी विषारी प्रचार करणे थांबवायला हवे, असे भारताच्यावतीने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे.
सीमेपलिकडील दहशतवादाच्या पाठिराख्यांकडून सल्ले ऐकून घेणे आपण अजिबात मान्य करता कामा नये. जगाला काय अमान्य आहे, त्याचे समर्थनही अजिबात होता कामा नये. ओसामा बिन लादेनला आश्रय आणि शेजारील देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्यांनी सुरक्षा परिषदेपुढे प्रवचन देण्याची गरज नाही. – एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री