उधमपूर – जम्मू-काश्मीरमधील कोणत्याही गावाचे नाव घेतले तरी देशभरातील नागरिकांनी त्या गावाशी संबंधित दहशतवादी हल्ल्यांच्याच घटना आठवतात. आता राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद, विभाजनवादाला उखडून फेकण्यात आले आहे.
राज्यात सामाजिक शांतता असते, म्हणजे काय याचा अनुभव नागरिक आता घेत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या स्थितीबद्दल भाष्य केले. पंतप्रधानांनी जम्मू विभागातील उधमपूर जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा लवकरच दिला जाणाररासून इथे विधानसभेच्या निवडणुकाही होतील, अशी ग्वाहीही मोदी यांनी यावेळी दिली.
गेल्या काही वर्षांपूर्वी काश्मीर म्हटले की, दहशतवादी कारवाया, फुटीरतावाद्यांचे कौतुक, लष्कराच्या जवानांवर दगडफेक, सीमेपलीकडून गोळीबार अशा अनेक गोष्टी येथील प्रशासनाला अस्थिर करत होत्या. त्या सीमेपलिकडच्या दहशतवादावर ना कुणाचे नियंत्रण होते, ना त्यावर कोणत्याही केंद्र सरकारने तोडगा काढला होता. वर्षानुवर्षे नागरिक भीतीच्या छायेतच जगत होते, याकडे लक्ष वेधून मोदी पुढे म्हणाले की, आजचा दहशतवादमुक्त काश्मीर ज्यांना पहायचा आहे, त्यांनी इथे अवश्य यावे आणि लष्कराने शांतता कशी प्रस्थापित केली आहे, ते अवश्य अनुभवावे.
सध्या दहशतवाद हटाओसारखे निवडणुकीचे मुद्दे राज्यात नसून, विकासाचे प्रकल्प आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतील वाढ यावर नागरिकांचे लक्ष केंद्रित झाल्याचे सांगून मोदी म्हणाले की, या सकारात्मक बदलाच्यासाठीच भाजपा अव्याहत प्रयत्न करत होता. आता तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदारांना, तुमच्या मंत्र्यांना सांगू शकाल.
पंतप्रधान म्हणाले की त्यांनी आतापर्यंत जे काही केले आहे ते या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा केवळ ट्रेलर आहे. विकासही होत आहे, विश्वासही वाढत आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक ही केवळ खासदार निवडण्यासाठी नाही तर देशात मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी आहे. जेव्हा सरकार मजबूत असते तेव्हा ते आव्हाने पेलते आणि आव्हाने पेलते… असे मोदी म्हणाले.
राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नव्हताच
मोदी म्हणाले की आता जम्मू आणि काश्मीर भारत आणि स्टार्टअपसाठी ओळखले जाईल. जम्मू-काश्मीरला हा निश्चय घेऊन पुढे जायचे आहे. काँग्रेसला राम मंदिराचा किती तिरस्कार आहे ते सर्वांनीच पाहिले. राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा असल्याचं ते सांगतात. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता. पण काॅंग्रेसला हिंदूंच्या भावनांशी काहीच देणेघेणे नव्हते. त्यामुळेच ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाहीत.
भाजपने उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये त्यांनी उधमपूरमधून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने उधमपूरमधून चौधरी लाल सिंह यांना उमेदवारी दिली आहे. उधमपूरमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सहापैकी तीन जागा जिंकल्या होत्या. उर्वरित तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या.
हे आहेत काश्मीरमधील बदल…
१. आता इथे शाळा जाळल्या जात नाहीत, तर शाळा सजवल्या जातात
२. आता येथे एम्स, आयआयटी आणि आयआयएम बांधले जात आहे
३. आता आधुनिक बोगदे, रुंद रस्ते आणि अप्रतिम रेल्वे प्रवास अनुभवता येतो आहे
४. आता येथे पर्यटक आणि भाविक विक्रमी संख्येने येतात
५. रस्ते, वीज, पाणी, प्रवास आणि स्थलांतर या सर्व सुविधा उपलब्ध