लडकतवाडी, नाथाचीवाडी, उंडवडी, खामगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
यवत : दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात नाथाचीवाडी येथे बिबट्याने घरापुढे बांधलेल्या गाईच्या हल्ला केल्याची घटना(दि.२३)रोजी मध्यरात्री घडली.या हल्ल्यात मधुकर देवराम होले.(रा.लडकतवाडी,ता.दौंड) यांच्या वासराचा मृत्यू झाला आहे.होले यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गाईपालन केले आहे.
लडकतवाडी आणि नाथाचीवाडीमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणावर शेती असणारे गाव आहे. या ठिकाणी बिबटयाचा वावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून त्याचा वावर मनुष्यवस्तीत देखील वाढला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होले यांच्या वासराचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
पूर्वी शेतकरी रानजनावरांच्या त्रासाने अत्यंत हवालदिल झाला होता.पण मध्यंतरीच्या काळामध्ये या परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठया प्रमाणात वाढला असून त्यास दडण देखील आहे. बिबट्या, रान जनावरांनाच आपले भक्षक बनू लागला होता. त्यामुळे रान जनावरे नाहीशी झाली पण आता बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. परिसरातील शेळी, मेंढी, गाई, कुत्रे यांच्या वर बिबट्या हल्ले करत आहे.
याचा वेळीच बंदोबस्त वन विभागाने करण्यासाठी या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी वन विभागीय अधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी भेट देऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे.नागरिकांनी आपल्या गोठ्याना बंदिस्त करून घ्यावे व रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे न जाण्याचे आवाहन केले.रात्रीच्या वेळी फटाके फोडावेत असेदेखील त्यांनी सांगितले.
“वनविभागाकडे पिंजऱ्यांची कमी आहे.वरिष्ठ कार्यालयाकडे पिंजऱ्याची मागणी केली असून याचा पाठपुरावा करत आहे.पुणे कार्यालयाकडून नागपूर विभागाकडे आम्ही मागणी केली आहे.पिंजरा उपलब्ध झाल्यावर या भागात पिंजरा बसवून बिबट्या जेरबंद करण्यात येईल.”
कल्याणी गोडसे, (वनपरीक्षेत्र अधिकारी दौंड)