मुंबई – शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर मंगळवारी रात्री पुण्याच्या कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची शिंदे-फडणवीस सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आता शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. यानंतर शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना यासंदर्भात आदेश देण्यात आले. या बैठकीला पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस महासंचालक रजनीश सेट उपस्थित होते.
काय आहे प्रकरण…
पुण्यातील कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधीच पोलिसांनी नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते या हल्ल्यातून सुखरुप बचावले आहेत. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.
Pune : हॉटेल भैरवीतर्फे शुद्ध शाकाहारी ‘बिर्याणी व कबाब’ फेस्टिवलचे आयोजन