पुणे : श्रावण महिना सुरु झाला आता महिनाभर तरी नॉन व्हेज खाता येणार नाही अशी मांसाहारी लोकांची खंत असते. हीच कमतरता भरुन काढण्यासाठी व शुध्द शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी हॉटेल भैरवी येथे बिर्याणी आणि कबाब फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
स्वरा ग्रुपच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या या फेस्टिवलचं उद्घाटन कल्याण भेळचे संस्थापक रमेश कोंढरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. 28 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी बिर्याणी आणि कबाबची चव पुणेकरांना चाखता येणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या या महोत्सवाला अनेक नामवंत व्यक्तींनी आतापर्यंत उपस्थिती लावली आहे. यावर्षीही पुण्यातील लोकप्रिय अशा कल्याण भेळचे सर्वेसर्वा रमेश कोंढरे यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. या उद्घाटनप्रसंगी ‘चव यशाची ‘ या कार्यक्रमा दरम्यान त्यांची मुलाखत घेण्यात आली. ‘आपल्याकडे आलेला ग्राहक खूश होईल अशी सेवा द्या,’ असा सल्ला त्यांनी तरुण हॉटेल उद्योजकांना दिला. त्यांना व्यवसायात आलेल्या अडीअडचणी, त्यातून काढलेले मार्ग याचंही अनुभव कथन त्यांनी यावेळी केलं .
यावेळी स्वरा ग्रुपचे सर्वे सर्वा रामदास मुरकुटे यानी स्वरा ग्रूप ची पूडची वाटचाल सांगताना मल्हार माची मधे 8 रूम व जलसृष्टि मधे नवीन 5 रूम डिसेंबर 2022 पर्यंत ग्राहका साठी उपलब्ध होतील असे संगीतले. स्वरा ग्रूप चे संचालक विश्वास मुरकुटे यांनी भैरवी माधिल बिर्यनी कबाब मेनू बदल चीं महिती दिली व सर्व पुणेकरानी या फ़ेस्टिवलला भेटीचे आमंत्रण दिले व कर्मचारी वर्गास शुभेच्छा दिल्या व आभार मानले.