वाचक व संपादक संवाद प्रस्थापित होणे जरुरी
पुणे, दि. 27 – वाचक वर्ग व संपादक यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होण्याची गरज आहे, असे विचार रसरंगचे पोतनीस यांनी वृत्तविद्या विभागात विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या चर्चेत व्यक्त केले. ते म्हणाले, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यास सतत लेखन व वाचन या सवयी हव्या असणे जरुरीचे आहे.
तेजस्वी चित्रपट हवेत
मिरज – तरुणांनी असे चित्रपट पाहावेत की, ज्या चित्रपटांमुळे पौरुष, लिद्द निर्माण होईल. तेजस्वी तरुण निर्माण होतील. आता प्रेमगीते नकोत राष्ट्रीय गीते हवीत. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे अभंग आपल्या तोंडी आले पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध सिनेनट शाहू मोडक यांनी काढले.
वजन घटविणाऱ्यांनो, सावधान!
नवी दिल्ली – वजन कमी करण्यासाठी जे प्रौढ लोक आहारावर नियंत्रण घालतात, त्यांच्या शरीरातील लोहतत्त्व कमी होण्याचा धोका असतो, असे आढळून आले आहे. जर्मन प्राध्यापक जॉर्ज स्लॉटर यांनी म्हटले आहे की, अशा नियंत्रित आहारात जरी वैविध्य आणले, तरीही लोहाचे प्रमाण अपुरेच राहते. त्यांच्या मते अशा 20 ते 40 टक्के लोकांत लोहाची कमतरता आढळते. स्त्रियांत हे प्रमाण 50 टक्के असते. अशा स्त्रियांनी वर्षातून दोन महिने तरी लोहयुक्त औषधे घेतली पाहिजेत.