नवी दिल्ली – शेतकरी कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच पंजाब दौऱ्यावर गेले होते. मात्र येथील शेतकऱ्यांचा विरोध पाहता आणि सुरक्षेच्या कारणामुळे मोदींना येथील मोठी सभा रद्द करावी लागली आहे. गृहमंत्रालयाने या संदर्भात निवेदन दिलं आहे.
पंजाबमधील फिरोजपूर येथे सभेचं आयोजन कऱण्यात आलं होतं. त्यासाठी मोदी फिरोजपूरला रवाना देखील झाले होते. मात्र ऐनवळी सुरक्षेच्या कारणास्तव सभा रद्द करण्यात आली. यावरून मोदी संतपल्याचं समोर आलं आहे. फिरोजपूरमध्ये पंतप्रधान मोदी मोठ्या जनसमुदायाला संबोधीत कऱणार होते. मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यावरच अडवला. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा दिल्लीला परतला.
दरम्यान एएनआयशी बोलताना एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे पीएम मोदी खूप संतापले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, “त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आभार, मी विमानतळावर जिवंत परत येऊ शकलो.”