मुंबई – राज्यात कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी राज्य सरकारने यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे. यातच नव्याने समोर आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लसीकरणावर अदिकाधिक भर देणार असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितले.
राज्यात कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी राज्य सरकारने यशस्वीरीत्या कामगिरी केली आहे. यातच नव्याने समोर आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली – @nawabmalikncp pic.twitter.com/A1ZWtOmv3F
— NCP (@NCPspeaks) December 8, 2021
देशात सध्या ओमायक्रॉनचे 22 रुग्ण आहेत. त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकडे राज्य सरकारचा भर असून ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा आलेख कमी आहे तिथल्या पालकमंत्र्यांना लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.