नवी दिल्ली – अभिनेत्री कंगना राणावत हिने आक्षेपार्ह वक्तव्यातून थेट देशद्रोह केला आहे. त्याबद्दल मोदी सरकारने कंगनाचा पद्मश्री सन्मान काढून घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली. कंगनाचे वक्तव्य देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा अवमान करणारे आहे.
तिने देशवासीयांची जाहीर माफी मागावी. अपात्र व्यक्तींना पद्म सन्मानांनी गौरवण्यात आल्यास काय होते ते कंगनाच्या वक्तव्यातून दिसून आले. पद्मश्री सन्मान मागे न घेतल्यास सरकार कंगनासारख्यांना प्रोत्साहन देत असल्याचा अर्थ निघेल, असेही त्यांनी म्हटले.