पुणे – नाशिक महार्गावर आज सकाळी 6.30 वाजता सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. कसारा घाटात हॉटेल शिवनेरी जवळ लोखंडाने भरलेल्या चालत्या ट्रकने पेट घेतला आहे. हा ट्रक मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असतानाच या ट्रकने पेट घेतला.
शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात असून, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तब्ब्ल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग वीजविण्यात यश आले आहे.
या घटने मुळे मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी ही वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.